Friday, September 10, 2021

साक्षरतेचे केरळ मॉडेल!

परवा जागतिक साक्षरता दिवस साजरा करण्यात आला आणि तो करत असताना मनात विचार आला की, फक्त पुस्तकातून घेतलेले ज्ञान किंवा पास झालेले वर्ग म्हणजेच साक्षरता म्हणायचे काय? कारण जर असे असेल तर 2010 च्या जनगणनेनुसार केरळ हे भारतातील सर्वात साक्षर असलेले राज्य आहे. सोबतच मागच्या वर्षी एन एस ओ द्वारे केल्या गेलेल्या सर्वेमध्ये सुद्धा 96.2% घेऊन पुन्हा एकदा देशात प्रथम क्रमांक पटकावलेले राज्य असलल्याचे आपणास दिसून येईल.

परंतु याच सर्वात जास्त साक्षर असलेल्या राज्यातील तरुण हे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असलेल्या इसिससारख्या आतंकवादी संघटनांमध्ये सामील होत असल्याचे आपणास दिसून येत आहे.


मग ज्या राज्यात सर्वात जास्त साक्षरता आहे त्या राज्यातील तरुणांना आतंकवादी म्हणून जीवन जगण्याची का हौस बरे आली असेल? याचाच अर्थ असा की, एक तर फक्त शिक्षण घेतले म्हणजे अक्कल येईलच असे नाही किंवा फक्त कागदावर आकडेवारी दाखवण्यासाठी त्या राज्यातील जनता साक्षर दाखविली गेली असेल. यापैकी कोणतेही एक कारण बरोबर असू शकतं.

1 नोव्हेंबर 1956 ला स्थापना झालेल्या या राज्याचा कारभार 1957 च्या निवडणुका पासून कम्युनिस्टांच्या हातात आहे आणि डाव्या विचारसरणीमुळेच आजही केरळ हे इज ऑफ डूइंग बिझनेस मध्ये 2019 नुसार भारतात 28 व्या स्थानावर आहे, यावरुनच या राज्याची औद्योगिक दृष्ट्या होत असलेली वाताहत आपणास दिसून येते. त्यामुळेच मग इथल्या लोकांना अरब देशांमध्ये काम करायला जावं लागतं आणि तेथे गेल्यानंतर विचार परिवर्तन (ब्रेनवॉश) करण्यास माथे भडकविणार्‍या लोकांना सहजच सावज मिळते.

आणखी एक गोष्ट इथे नमूद करावीशी वाटते ही भारतातील सर्वात साक्षर असलेलं हे केरळ राज्य गुन्ह्यामध्ये सुद्धा अव्वल आहे आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही परंतु सत्य हे आहे कि याच गुन्ह्याच्या आकडेवारीत उत्तर प्रदेश आणि झारखंड यांच्यासारखे मागास म्हणून हिणवल्या गेलेले राज्य 26 व्या आणि 30 व्या स्थानावर आहेत.


मग जर या राज्याचे साक्षरतेचे प्रमाण इतक्या मोठ्या प्रमाणावर असूनही साक्षर झालेले लोक धर्मांतरणाकडे किंवा दहशतवादाकडे जात असतील तर नक्कीच साक्षरता आणि समजदारपणा या दोन्हीचा दूरदूरपर्यंत संबंध नाही. वरील सर्व बाबींचा विचार केला असता, डाव्यांनी उभे केलेले साक्षरतेचे केरळ मॉडेल किती फसवे आहे? याचा अंदाज येतो. त्यामुळेच आपला ओढा हा साक्षर आणि समजदार बनण्याकडे असला पाहिजे, फक्त पुस्तकी ज्ञान असून उपयोग नाही!


धन्यवाद!

पवन✍️




Tuesday, September 7, 2021

तान्हा पोळा! आपले सण, आपली संस्कृती!!


विदर्भात बैल पोळ्याच्या दुसर्‍या दिवशी 'तान्हा पोळा' हा साजरा करण्यात येतो. या दिवशी लहान मुले लाकडी नंदीबैल घेऊन घरोघरी जातात. ज्याप्रमाणे बैलपोळ्याच्या दिवशी वर्षभर शेतात राबणार्‍या बैलांविषयी कृतज्ञता म्हणून 'बैलजोडी' ही घरोघरी नेल्या जाते आणि त्यांची पुजा केली जाते. त्याचप्रमाणे आजच्या दिवशी लहान मुले ही आपला लाकडी  'नंदीबैल' घेऊन घरोघरी जातात. त्यांची (मुलांची)  आणि नंदीबैलाची महिला मंडळीकडून मोठ्या श्रद्धेने पुजा केली जाते. 

लहानपणी आम्हीसुद्धा नंदीबैल घेऊन घरोघरी जायचो. त्यावेळी इतकी आर्थिक सुबत्ता नसल्याने कोणाच्या घरी आम्हाला खाऊ म्हणून साखर दिली जायची तर कोणाच्या घरी खोबरा गोळी. जास्तच सधन असतील तर 50 पैसे - 1 रुपये वाले चोकलेट आणि त्याहीपेक्षा जास्त सधन असतील तर मग पैसे मिळायचे. 50 पैसे, 1 रुपया, 2 रुपये, 5 रुपये आणि 10 रुपये सुद्धा मिळायचे. एकदा नंदी बैल घरोघरी नेऊन आणला की, आम्ही  सर्व मित्रमंडळी एका ठिकाणी जमून मग कोणाला जास्त कमाई झाली? याची मोजदाद करीत असू. आजच्या काळात प्रत्येकाच्या घरात आर्थिक सुबत्ता असल्याने पैशाचे तितके काही अप्रूप वाटत नाही, तरीही आपल्या प्रथा-परंपरा सुरू राहाव्यात आणि आपल्या पुढील पिढीला त्या कळाव्यात म्हणून आजही आम्ही हे नित्यनेमाने करतो. 

मागच्या वर्षीपासून (3 वर्षाचा झाल्यानंतर) माझा मुलगा घराच्या आजूबाजूला नंदीबैल फिरायला न्यायला लागला आहे. जो त्याच्या आजोबांनी (माझे सासरे) घेऊन दिलेला आहे . त्याची आजी(माझी आई) मस्त सजवून देते. अकखा दिवस लगबग असते आणि मुलाच्या मनात उत्कंठा असते (आमच्याही मनात लहानपणी असायची) की, संध्याकाळचे 4 कधी वाजतील आणि कधी पोळ्यात नेऊन आपला नंदीबैल इतरांसमोर उभा करून कसा सुंदर सजविला आहे? याची पोहोचपावती मिळेल आणि मग घरोघरी जाऊन त्याची पुजा करून आणेल.

येश्मितला सध्या इतकं काही कळत नाही पण तरीही त्याच्यात उत्साह असतो की, नंदीबैल आज वर्षातून एकदा चालवायला मिळणार. आज घरोघरी फिरवून आणला की, मग पुन्हा त्याला व्यवस्थित झाकून सज्ज्यावर ठेवल्या जातो. जेणेकरून पुढीलवर्षी पुन्हा वापरता येईल.

असा हा 'तान्हा पोळा' लहान मुलांनासुद्धा नकळतपणे भूतदया आणि शेतात वर्षभर कष्ट करणार्‍या शेतकर्‍यांविषयी आणि बैलांविषयी कृतज्ञता शिकवून जातो. 

जपा आपले सण, आपली संस्कृती!

धन्यवाद!

पवन✍️


Monday, September 6, 2021

आज पुन्हा एकदा शिक्षक 'दीन' होता!!

लहानपणीपासून शिक्षकदिन म्हटले की, अंगात एक वेगळाच उत्साह संचारायचा. प्रत्येकाची आपली-आपली भूमिका ठरलेली असायची. (त्यातही आपले सर्वात आवडते शिक्षक-शिक्षिका बनण्याची चढाओढ) कोणी मुख्याध्यापक, कोणी चपराशी अशा र्व प्रकारच्या विविध भूमिका करीत 5 सप्टेंबर या दिवशी पूर्ण शाळेची जबाबदारी ही विद्यार्थी दशेत सर्वजण घ्यायचे.

पण मागील वर्षापासून कोरोनामुळे शाळेत मुलांना बोलविता येत नाही आणि ऑनलाईन सगळे उपक्रम राबवायचे आहेत/राबविल्या जात आहेत. पण ग्रामीण भागात ऑनलाइन नेटवर्कची समस्या आणि सोबतच इतर संसाधने नसल्यामुळे किंवा कमतरता असल्यामुळे फक्त उपक्रम राबवायचे म्हणून या सर्व गोष्टी केल्या जातात.

परंतु विद्यार्थी शाळेत नाहीत तर मग त्या शिक्षकदिनाला अर्थच उरत नाही. कारण, जेव्हा विद्यार्थी शिक्षकांच्या भूमिकेत येतात त्यावेळी त्यांना आपले शिक्षक कशाप्रकारे कोणताही घटक शिकविण्यापूर्वी किती तयारी करतात? याची जाणीव होते, वर्गात विद्यार्थ्यांना शिकविताना शिक्षक सुनियोजित पद्धतीने आपले अध्यापनकार्य कसे पार पाडत असतात?, सोबतच सर्व शाळेची जबाबदारी कशा पद्धतीने सांभाळली जाते? याची जाणीव विद्यार्थ्यांना होते.आणि त्याचाच सकारात्मक प्रभाव हा पूर्ण वर्षभर विद्यार्थ्यांच्या वागण्या-बोलण्यातून जाणवत असतो. ऑनलाइन शिक्षणाचा विरोध मी करतो असं नाही, ऑनलाइन शिक्षणाचा पुरस्कर्ता मी सुद्धा आहे. परंतु प्रत्येक ठिकाणी परिस्थितीनुरूप निर्णय घेणे गरजेचे आहे आणि अशा कार्यक्रम प्रसंगी तर भावनांची गरज असते आणि त्यावेळी ऑनलाइनपेक्षा ऑफलाइनच जास्त प्रभावकारी ठरते, असे माझे वैयक्तिक मत आहे.
आज शाळा बंद जरी असल्या तरी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत घरोघरी जाऊन शिक्षण पोहोचविण्याचा मोडका-तोडका प्रयत्न आपापल्या परीने आम्ही करीत आहोत. (यात काही शिक्षक अपवाद असतील यात बिलकुल शंका नाही)

ज्यावेळी आम्ही घरी जाऊन शिक्षण देण्याचा मागच्या वर्षभरापासून प्रयत्न करतोय त्यावेळी दिसून येतं की, मुलांची शिकण्याची इच्छा आहे परंतु पुरेसा वेळ त्यांना देता येत नाही आणि धावतं शिक्षण सर्व 75 मुलांना दररोज मिळावं, याचा प्रयत्न आम्हा सर्वांकडून होतो. मुलेसुद्धा शिक्षकांकडून जे जे दिलं जात आहे, ते आपल्या कवेत घेऊन आत्मसात करण्याचा प्रयत्न करतात आणि ते नक्कीच वाखाणण्याजोगं आहे. कारण, शिक्षक असताना घेतलेले शिक्षण आणि शिक्षक नसतांना 'स्वबळावर घेतलेले शिक्षण' यात जमीन-अस्मानचा फरक आहे, हे एका शिक्षका व्यतिरिक्त आणखी कोण चांगल्या पद्धतीने समजू शकतो?

जाता जाता ईश्वराला इतकीच प्रार्थना आहे की, पुढच्या वर्षीचा शिक्षकदिन तरी खरोखर 'शिक्षकदिन'च व्हावा. त्यादिवशी पुन्हा शिक्षक 'दीन' असल्याचा अनुभव देऊ नये!!

धन्यवाद!!
पवनWriting hand

Wednesday, September 1, 2021

अमेरिका या 'चिल्लर' देशापेक्षा, भारत हा नक्कीच 'कडक शंभरची नोट'!!

भारत आणि तालिबान यांच्यामध्ये काल कतार येथील भारतीय दूतावासात भेट झाल्याची बातमी संध्याकाळी भारतीय परराष्ट्र खात्याने जगाला दिली.
अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर पहिल्यांदाच अशी 'औपचारिक भेट' ही भारतीय राजदूत दीपक मित्तल आणि अफगाणिस्तानमधील तालिबान गटाचा राजकीय नेता शेर मोहम्मद अब्बास यांच्यात घडून आली.
मी इथे असे म्हणणार नाही की, यापूर्वी भारताकडून त्या लोकांसोबत अनौपचारिक चर्चा झालेली नसेल. कारण अशी अनौपचारिक चर्चा झाली नसती तर ज्या ठिकाणावरून अमेरिकेला त्यांच्या नागरिकांना काढणे शक्य होत नव्हते/आजही होत नाहीये. (नागरिकांनाच कशाला ? त्यांनी तर काल आपण हृदयद्रावक फोटोत बघितल्याप्रमाणे प्राण्यांना सुद्धा तिथेच टाकून पळ काढला.) त्याठिकाणी भारताने आपले नागरिक 'डंके की चोट पर' सुरक्षितपणे परत भारतात आणले. तसेच त्या ठिकाणी अल्पसंख्यांक असलेल्या शीख आणि हिंदूंनासुद्धा सुरक्षितपणे भारतात आणून आश्रय दिल्या जात आहे.
कालच्या औपचारिक भेटीचा जो तपशील बाहेर आलेला आहे. त्यामधून इतकेच कळतंय की, अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर हा भारतात दहशतवाद पसरविण्यासाठी केला जाईल याबाबतीत भारताने चिंता व्यक्त केलेली आहे आणि सोबतच अफगाणिस्तानात अजूनही असलेल्या भारतीयांच्या सुरक्षित परतीसाठी होता.

अफगाणिस्तानमध्ये आज जो तालिबानी गट सध्या सत्तेवर आहे त्यांनी या दोन्ही गोष्टी होऊ देणार नाही आणि भारताने निश्चिंत राहावे, अशी  काल हमी दिलेली आहे आणि यापूर्वी सुद्धा त्यांच्या प्रवक्त्यांनी हे स्पष्ट केलेले आहे की, नवीन आलेलं तालिबान्यांच सरकार हे भारतासोबत चांगले व्यापारिक आणि राजकीय संबंध ठेवण्यास इच्छुक आहे आणि लवकरच भारताशी त्याबाबतीत संपर्क केला जाईल.

या दोन्ही गोष्टी होतीलच यात माझ्या मनात तरी शंका नाही. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे सध्या भारतात सत्तेवर असलेलं सरकार आहे. ज्यामध्ये मोदी- शहा आणि अजित डोभाल यांच्यासारखे दूरदृष्टी असणारे आणि देश सुरक्षेसाठी कोणतीही तडजोड न करणारे व्यक्ती सत्तेत आहेत.

याची चुणूक आपल्याला त्याचवेळी आली ज्यावेळी अमेरिका त्यांच्या नागरिकांना तिथून काढू शकत नव्हती आणि भारताचे नागरिक आरामात भारत सरकारने परत आणले होते. यामागे पडद्यामागे होत असलेल्या घडामोडी नक्कीच कारणीभूत असेल.

आत्ताच दोन दिवसापूर्वी ज्येष्ठ अभ्यासक आणि मार्गदर्शक मिलिंददादा यांच्याशी कोरोनाची पहिली लाट मोठ्या प्रमाणात पसरविण्याचे कारस्थान करणारा जमातचा मौलाना साद कुठे असेल? यावर चर्चा सुरू असताना, एक गोष्ट आम्हा दोघांच्याही  मनात आली की, त्यावेळी त्याला अटक न करणे हा एक कुटनीतीचा भाग असू शकतो का? ज्याचा फायदा आज होत असावा?
तसं या सर्व गोष्टी माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरच्या आहेत. पण तरीही या घडत असलेल्या गोष्टींचे निरिक्षण केल्यास थोडीफार लिंक लागत असल्याची जाणीव होते.

जाता जाता इतकेच म्हणेल की, भारतातील विरोधीपक्ष कितीही म्हणत असला की, भारत सरकार अफगाणिस्तानसमोर नांगी टाकून बसलेला आहे!!

तरीही जनतेच्या डोळ्यासमोर सत्य अगदी स्पष्ट आहे की, अमेरिका या 'चिल्लर' देशापेक्षा भारत हा नक्कीच 'कडक शंभरची नोट' म्हणून खमठोकपणे अफगाणिस्तानसमोर उभा आहे!!
बघू या पुढे आणखी काय काय होतंय!!

धन्यवाद!!
पवन✍️


भारत 1989-2014 आणि नंतर - आमुलाग्र बदल!!

रविवार विशेष!! आजचा लेख जरा जास्तच मोठा आहे. पण भारताचा भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ समजून घ्यायचा असेल, तर आवर्जून वाचाच. भारतात नेहमीच...