Tuesday, June 22, 2021

मढ्याच्या टाळूवरच लोणी!!


बर्‍याच दिवसापासून योगीजींना टार्गेट करण्याच्या निमित्ताने रुदाली गॅंगकडून गंगेतील प्रेतांवर गलीच्छ राजकारण सुरू होते. खरे कारण हे त्या सगळ्यांनासुद्धा माहिती होते, कारण दरवर्षी या बातम्या टीव्ही, वर्तमानपत्र यातून येतच असतात आणि त्या अखिलेश, मायावती आणि योगीजी या सर्वांच्याच काळात आलेल्या आहेत. तेथील रूढी-प्रथा, परंपरा यास कारणीभूत आहेत, हे सर्व जाणून होते. पण यावेळी कोरोना आला आणि कॉंग्रेसला आपल्या टूलकीटनुसार योगीजींना बदनाम करण्याचा अजेंडा राबवायचा होता. त्यामुळे त्यांनी जाणूनबुजून त्याला कोरोना मुत्युसोबत जोडून जनतेत भ्रम पसारविण्याचा प्रयत्न केला. मग मेसेजेस व्हाट्सएप्प आणि इतर समाजमाध्यमातून ठीक-ठिकाणी फिरायला लागले. त्याला आमच्यासारखे 'भक्त' एनडीटीव्हीसारख्या त्यांच्या आवडीच्या चॅनेलमध्ये प्रकाशित झालेल्या जुन्या बातम्या दाखवून तसेच तिथे असलेल्या रूढी परंपरांचे दाखले देऊन  खोडायला लागले. यासोबतच टूलकिट उघड पडल्यानंतर कॉंग्रेस आणि रुदाली गॅंगने या मुद्दयातील जोर कमी केला आणि दुसरे मुद्दे पकडले. 

पण आता मी पुन्हा यासाठी हे सगळं उकरून काढतोय कारण घटनाच तशी घडलीय, एका प्रसिद्धीलोलुप म्हणा किंवा रुदाली गॅंगचा माणूस म्हणा, त्याने अलाहाबाद हायकोर्टमध्ये, गंगा नदीच्या प्रयागराजजवळील विविध घाटावर दफन करण्यात आलेल्या मृतदेहांच्या बाबतीत जनहित याचिका (पीआयएल) टाकली.

त्यावर दिनांक 18 जून 2021 रोजी मुख्य न्यायाधीश संजय यादव यांच्या नेतृत्वात (सोबतीला न्यायाधीश प्रकाश पाडिया) बसलेल्या खंडपीठाने याचिकाकर्त्याच्या हेतुला कसे उघडे पाडले, वाचा जसेच्या-तसे :-

कोर्ट : कृपया आम्हाला सांगा की, आजपर्यंत तुम्ही सार्वजनिक हितासाठी काय योगदान दिलेले आहे?

जर आपण सार्वजनिक कामासाठी इतके उत्साही आहात तर आम्हाला सांगा की, किती मृतदेह ओळखून तुम्ही त्यांचा दफनविधी किवा अग्निदाह करण्यास सक्षम आहात?

वकील प्रणवेश (याचिकाकर्त्याचे वकील) : मी स्वतः त्याठिकाणी भेटी दिलेल्या आहेत आणि तेथील परिस्थिती खूप जास्त भयानक आहे.

कोर्ट: जो मुद्दा तुम्ही मांडलेला आहे त्यात तुमचे स्वतःचे योगदान काय? जसे तुम्ही काही मृतदेह बाहेर काढले आणि त्यांचे अंतिमसंस्कार केलेले आहेत का?

कोर्ट: गंगा नदीच्या काठावर विविध समाजाचे लोक राहतात आणि त्यांच्या काही रूढी-परंपरा आहेत. कृपया तुम्ही मागणी करीत असलेल्या बाबतीत तुमचे असलेले योगदान दाखवा.

कोर्ट : प्रत्येकाने  या घाटांवर भेट दिलेली आहे, कारण प्रत्येकाचे कोणीतरी जवळचे आप्तेष्ट मृत्यू पावलेले  आहेच.

प्रणवेश : कृपया तुम्ही या बाबतीत एफिडेविट मागवा!

कोर्ट : आमचे तुमच्या उत्तराने समाधान झालेले  नाही, आम्ही एफिडेविट मागवणार नाही. जर हे तुमच्यामते, सार्वजनिक हितासाठी आहे तर आम्हाला सांगा की, तुम्ही यात कशाप्रकारे योगदान दिलेले आहे?.

प्रणवेश : कृपया माझ्या एफिडेविटमधील पॅरा-13 बघावा, आणि मी लोकांनी 'इलेक्ट्रिक शवदाहीनी' चा वापर करून अंत्यसंस्कार करण्यासाठी जागृती करतो.

कोर्ट: तुम्ही घेतलेले श्रम कुठे आहेत? आम्हाला दाखवा की, तुम्ही किती लोकांना मदत केलेली आहे?

प्रणवेश : माझ्याकडे कोणतेही पुरावे नाहीत, पण तुम्ही समजून घ्या, बाहेरची परिस्थिती ही खूप भयानक आहे.

कोर्ट : तुमच्यासाठी चांगले राहील की, तुम्ही यावर आणखी संशोधन करावे आणि आपली याचिका परत घ्यावी, आम्ही अशा याचिकावर सुनावणी करू शकत नाही.

प्रणवेश : परंतु, बाहेरची परिस्थिती ही खूप भयानक आहे.

कोर्ट : आम्हाला तुमच्या या बड्या-बड्या शबदांमध्ये आणि विशेषणामध्ये कोणताही इंटरेस्ट नाही. जमीनीवरील सत्य वेगळे आहे, ज्याचे तुम्ही परीक्षण केलेले नाही. 

मुख्य न्यायाधीश :  केवळ तुमच्या फायद्यासाठी आम्ही अशा याचिकांना परवानगी देणार नाही, हे तुम्हालाही माहिती आहे.

"कृपया तुम्ही आम्हाला तुमचे असलेले योगदान दाखवा अन्यथा आम्ही तुमच्यावर मोठा दंड आकारू. कारण ही सार्वजनिक हितसंबंध याचिका नसून प्रसिद्धी हितसंबंध याचिका आहे."

तुम्ही जमीनीवरील वास्तविकतेचा अभ्यास केलेला नाही आणि जर तुम्ही म्हणत असाल की, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (एनएचआरसी) यासंबंधी आदेश दिलेले आहेत तर जा आणि त्यांच्याकडे तक्रार करा आणि सोबतच जर त्यांनीही ऐकण्यास नकार दिला तर,

"आमच्याकडे परत दिशानिर्देश मागायला येऊ नका"

प्रणवेश : ही राज्य सरकारची जबाबदारी आहे की, त्यांनी गंगा नदीच्या काठावरील मृतदेहांचे त्यांच्या धार्मिक संस्कारानुसार अंत्यसंस्कार करून त्या मृतदेहांची विल्हेवाट लावावी.

कोर्ट : राज्य सरकारने ते का करावे? जर एखाद्याच्या परिवारात मृत्यू झाला असेल तर ती राज्याची जबाबदारी?

इथे बर्‍याच प्रथा-परंपरा आहेत, आणि भिन्न-भिन्न समाज आहेत, जे आपल्या समाजानुसार वेगवेगळ्या प्रकारे 'संस्कार' पूर्ण करतात आणि तुम्ही त्याच्यावर अभ्यास/संशोधन केलेले नाही.

आम्ही अशा याचिकांची सुनावणी करू शकत नाही आणि आम्ही तुम्हाला कोणताही दिलासासुद्धा देऊ शकत नाही. तुम्ही जाऊन संशोधन/अभ्यास करा आणि परत या.

कोर्टाचा आदेश पुढीलप्रमाणे :

- आमचे मत आहे की, याचिकाकर्त्याने गंगा नदीच्या काठावर राहणार्‍या विविध समाजातील लोकांमध्ये असलेल्या विविध रूढी-परंपरा आणि चाली-रितीवर कोणताही अभ्यास केलेला नाही.

- आम्ही याचिकाकर्त्यास याचिका मागे घेण्यास आणि अभ्यास/संशोधन करून पुन्हा दाखल करण्यास परवानगी देतो.

- याचिका खारीज करण्यात येते.


आणि अशाप्रकारे आजपर्यंत आपण सगळे मुद्दे सांगून विरोधकांचा खोटा असलेला दावा खोडून काढत होतो तेच मुद्दे न्यायाधीश महोदयांनी आपल्या निकालात मांडून आपल्या मुद्द्यांना दुजोराच दिलेला आहे. त्यासाठी अलाहाबाद हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश श्री संजय यादव आणि सोबतीला असलेले न्यायाधीश श्री  प्रकाश पाडिया या दोघांचेही आभारच.  त्यामुळे यापुढे पुन्हा जर कोणीही असा आरोप केला तर त्याला आता हेच फेकून मारा..

धन्यवाद!

पवन✍️


60 मूर्ख विद्वान माजी अधिकार्‍यांचे पत्र, सेंट्रल विस्टा प्रकल्प, केंद्रीय मंत्री श्री हरदीप सिंग सुरी आणि चिरफाड!!


मागील दोन दिवसांपासून केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी उल्लेख केलेल्या 60 विद्वानांच्या पत्राची समाज माध्यमांवर जोरदार चर्चा चालू आहे. याच पत्राबद्दलची अधिक थोडीशी माहिती आपण या लेखामधून घेणार आहोत. 

सर्वप्रथम हे लक्षात घ्या की ज्या पत्राचा उल्लेख केंद्रीय मंत्र्यांनी केला ते पत्र आता लिहिलेले नाही तर ते मागच्या वर्षी म्हणजेच 2020 च्या मे महिन्यात लिहिण्यात आलेले होते.

मग आता कसे काय अचानक बाहेर आले?

त्यामागे कारण ठरलंय ते म्हणजे, केंद्रीय मंत्री श्री हरदिप सिंग सुरी हे परवाच्या दिवशी प्रेस कॉन्फरन्सची तयारी करत असताना त्यांच्या सहकार्‍यांनी त्यांना हा मुद्दा लक्षात आणून दिला, मग त्यांनी आपल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्याची चिरफाड केली आणि जनतेमध्ये ही चर्चा सुरू झाली. 

पत्र लिहिणार्‍यामध्ये कोण-कोण होते?

नावांची यादी खालीलप्रमाणे आहे. 


आता या पत्रातील काही ठळक मुद्दे घेऊया!! 

1. पत्रात हे 60 विद्वान/ मुर्ख (केंद्रीय मंत्र्यांच्या भाषेत) म्हणतात की, जर सूत्रानुसार आलेल्या माहितीवर  विश्वास केला तर असे कळते की,  जुनी इमारत "अनलकी" आहे म्हणून नवीन इमारत बांधली जात आहे, तसेच नवीन इमारत बांधताना आताचे सरकारला आपल्या विचारांची छाप यावर सोडायची आहे. यासोबतच ते म्हणतात की, या प्रोजेक्टवर संसदेमध्ये चर्चा झाली नाही. 

2. पुनर्निर्माण कार्य करण्यासाठी टेंडर काढण्यात आले ते फार घाइने काढण्यात आले (त्यांना यूपीएच्या काळात सगळी कामें आरामात करायची सवय होती कदाचित) आणि जी फर्म आर्किटेक्चर म्हणून निवडण्यात आली तिला जे काही मनमानी बदल करायचे आहेत त्याकरिता सर्व प्रकारच्या परवानग्या सरकारी विभागाकडून देण्यात आल्या.

( कदाचित त्यांच्या नोकरीच्या काळात परवानग्या अशाच दिल्या गेल्या असतील, म्हणून त्यांना असे वाटते) 

3. कोर्टात मॅटर असतानाही सर्व परवानग्या देण्यात आल्या, तसेच ज्यांनी कोणी परवानग्या दिल्या त्या सर्व संस्था एक रबर स्टॅम्प म्हणून कार्य करीत आहे असे त्यांना वाटते.  पहिली गोष्ट म्हणजे कोर्टात मॅटर असताना कोर्टात ही माहिती दिली गेली असल्यास त्यात काही आक्षेपार्ह असेल तर कोर्ट स्वतःच यावर निर्बंध लावते. पण कदाचित कोर्टाला तशी गरज वाटली नसेल. सोबतच जेव्हा केव्हा हे माजी अधिकारी सरकार मध्ये काम करत होते तेव्हा तेसुद्धा एक रबर स्टॅम्प होते, असे ते स्वतःच म्हणतात. 

4. त्यांना आणखी एक अडचण आहे की कोरोनाच्या काळात सुद्धा एन्व्हायरमेंट कमिटीने मिटिंग का बर ठेवली?

कोरोनाचा बहाना घेऊन सगळं काम बंद ठेवा, असं कदाचित त्यांना म्हणायचं आहे. 

5. दिल्ली आणि भारतातील ऐतिहासिक वारसा असलेली सेंट्रल विस्टा ईमारत ही इंग्रजांच्या काळात बांधलेली आहे आणि त्याचं संवर्धन आपण आजपर्यंत केलेले आहे आणि आत्ता तिच्यामध्ये जर काही बदल केले तर ती ऐतिहासिक वास्तू किंवा इतिहासाची छेडछाड होईल, असे ते म्हणतात. म्हणजे आजपर्यंत इंग्रजांच्या काळातले पूल, रस्ते आणि इमारती ज्या जीर्ण झाल्या होत्या किंवा काळानुसार त्यात बदल करुन मोठ्या करणे गरजेच्या होत्या, तीसुद्धा इतिहासाची छेडछाड होती असेच म्हणावे लागेल. 

6. या इमारतीचे पुनर्निर्माण कार्य दिल्लीच्या पर्यावरणावर प्रभाव पाडेल आणि दिल्लीच्या मध्यभागी असल्यामुळे त्यासाठी शहराच्या मधोमध असलेल्या बऱ्याच मोठमोठ्या झाडांना कापावे लागेल.

दिल्लीमध्ये आधीच भरपूर प्रदूषण आहे, असं ते स्वतःच सांगतात आणि या बिल्डिंगमुळे आणखी ते वाढेल, असं म्हणतात. इतकेच नाही तर यमुना नदीचे सुद्धा प्रदूषण वाढेल असेही बोलण्यास ते घाबरत नाहीत.

हसण्यासारखी गोष्ट आहे की, आपण दैनंदिन जीवनात ज्या गोष्टी वापरतो त्यामुळे किती प्रदूषण होते? हे त्यांनाही माहिती आहे तरीही उगाच प्रदूषणाच्या नावाखाली बोटं मोडत आहेत.

7. आणखी एक हास्यास्पद दावा त्यांनी केला आहे की, ईमारत पुनर्निर्माण केल्यास दिल्लीचे मध्यमवर्गीय लोक जे उन्हाळ्याच्या रात्रीत मोफत थंड हवा घ्यायला येतात आणि आईस्क्रीम खाऊन जीवनाचा आनंद लुटतात. त्यांना ही सुविधा भविष्यात घेता येणार नाही. यासोबतच त्यांनी म्हटले आहे की, सरकारी ऑफिसने ही जागा व्यापल्यानंतर या ठिकाणी जे "शांतीपूर्ण मोर्चे" होत होते किंवा काही कार्यक्रम-समारंभ होत होते, ते करता येणार ना? 

अरे बाबांनो!! ते करायचे आहे तर मग रामलीला मैदान आणि असे अनेक मैदाने दिल्लीमध्ये उपलब्ध आहेत, तिकडे जाऊन करा ना!! सरकारी बिल्डिंगमध्ये "शांतीपूर्ण मोर्चे - समारंभ" कसे करू देणार? 

8. ते पुढे म्हणतात की, या अत्यंत महत्वाच्या सार्वजनिक जागेत नेमक्या कशा प्रकारची बांधकाम योजना केली गेलेली आहे?   हे समजण्यासाठी या योजनेचे रेखाचित्र, डेटा किंवा यासाठी केल्या गेलेल्या अभ्यासाची माहिती या विषयातील तज्ञ लोकांसाठी आणि सामान्य नागरिकांसाठी उपलब्ध नाही, हे सर्व लोकशाही निकषांच्या विरोधात आहे. कदाचित यांना असे म्हणायचे आहे की, हे सर्व पब्लिक डोमेनमध्ये आणून आतंकवाद्यांना आतमधल्या सर्व बारीकसारीक गोष्टींची माहिती देऊन "पुन्हा एकदा संसद भवनावर हल्ला करण्यास मदत करावी" काय लॉजिक आहे! 

9. खासदारांची संख्या वाढणार असल्यामुळे नवीन निर्माण कार्य सुरू करावे लागले हा दावा चूक आहे असे ते म्हणतात कारण 2061 नंतर लोकसंख्या कमी होणार आहे, असा दावा त्यांनी केलेला आहे.

भारत देश आहे भाऊ!! कागदावर तुम्ही कितीही सांगितलं की लोकसंख्या नियंत्रणात आणतो, तरीही लोक काही ऐकत नाहीत.

'एक से भले दो, दो से भले चार' म्हणतात. 

10. ते म्हणतात की मोदी सरकारने जाहीरनाम्यात दावा केला होता की, 'मिनिमम गव्हर्मेंट आणि मोअर गव्हर्नन्स' मग त्या हिशोबाने नवीन बिल्डिंगचे पुनर्निर्माण कार्य करू नये!!

अरे बाबा पण गव्हर्नमेंट चालवायची किंवा मोअर गव्हर्नन्स करायचं, यासाठी मनुष्यबळ लागणार आणि मनुष्यबळ लागणार म्हणजेच त्यांना बसायला जागाही लागणार, इतक सोपी लॉजिक आहे.

यांना मोदीजींच्या जाहीरनाम्यात काय आहे हे लक्षात आहे, पण कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यात 1970 पासून "गरीबी हटावचा" नारा होता. त्यावर त्यांनी कधी आजपर्यंत आवाज काढला नाही.

11. त्यांनी या पत्रात उल्लेख केला की, 'रोम जळत होतं तेव्हा निरो हा फिडेल वाजवत बसला होता' यावरून तुम्ही लक्षात घ्या की, हेच लोक वरती लोकशाहीचा डंका पिटत होते आणि आता 303 खासदार जनतेतून निवडून आलेल्या पंतप्रधानांशी ते कोणत्या भाषेत बोलतात. 

12. ते म्हणतात की, याचा खर्च 20000 करोड होणार आहे, तो खर्च वाचवून देशात चांगल्या आरोग्य सोयी-सुविधा पुरविण्यात याव्यात, असे ते म्हणतात यातूनच ते हे मान्य करतात की, ज्यावेळी ते प्रशासनात होते त्यावेळी त्यांनी या सोयी सुविधांचे निर्माण केलेले नाही.

आणखी एक गोष्ट प्रत्यक्षात या बांधकामास येणारा खर्च 8000 करोडच्या जवळपास आहे जो महाराष्ट्रातील एमएलए होस्टेलच्या खर्चापेक्षाही कमी आहे. 

अशा पद्धतीने आपल्या लक्षात येते की, कशाप्रकारे एका पक्षाची बाजू घेऊन हे लोक लोकशाहीच्या नावाखाली देशाच्या पंतप्रधानांनाही कमी जास्त बोलायला घाबरत नाहीत. सोबतच त्यासाठी लॉजिक देताना इतके चिल्लर लॉजिक देतात ज्याची कीव येते.

हे लोक एवढ्या वर्षापासून सनदी अधिकारी म्हणून आपल्या भारतीय प्रशासनात काम करत होते, विचार करा यांनी आजपर्यंत देश कसा चालवला असेल? 

धन्यवाद!!!

पवन!!! 


नरेंद्र मोदींची खासियत : सुमडीत कुमडी!


भारत सरकारने दिनांक 3 जून रोजी म्हणजेच आज सांगितले की, देशात सर्व जनतेचे लवकरात लवकर लसीकरण व्हावे म्हणून 'स्वदेशी' कंपनी असलेली हैदराबाद मधील बायोलॉजिकल-ई कडून त्यांनी 30 कोटी कोविड-19 ची लस घेण्याची सर्व तयारी पूर्ण केलेली आहे  आणि त्यांनी डोज राखून ठेवावे, म्हणून भारत सरकार या कंपनीला 1500 कोटी रुपये देणार आहे. कोविशिल्ड आणि कोवाक्सिन नंतर ही तीसरी भारतीय लस बाजारात आलेली असेल. 

या लसीची पहिली आणि दूसरी चाचणी ही यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे आणि आता तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे.

बायोलॉजिकल-ई यांनी बनवलेली लस ही आरबीडी प्रोटीन सब युनिट आहे आणि पुढील काही महिन्यात म्हणजेच ऑगस्ट ते सप्टेंबर 2021 पासून याचे प्रोडक्शन आणि स्टॉक करणे सुरु होणार आहे.

बायोलॉजिकल-ई यांनी पाठविलेल्या प्रस्तावाची तपासणी ही लस संशोधन आणि निर्मितीसाठी तयार करण्यात आलेला गट नॅशनल ग्रुप ऑन वाक्सिन अडमिनिस्ट्रेशन फॉर कोविड 19 (एनईजीव्हीएसी)  यांनी केली आणि सर्व खात्री केल्यानंतर त्यांनीच मंजुरीसाठी शिफारस सुद्धा केलेली आहे.

बायोलॉजिकल-ई ला, ही लस बनवण्यासाठी भारत सरकारद्वारे त्याच्या लॅबोरेटरी संशोधनाच्या पूर्वीपासून तर आत्ता तिसऱ्या टप्प्यापर्यंत सर्व सहकार्य पुरविण्यात आलेले आहे.  त्यांना संशोधनास मदत म्हणून सुरुवातीच्या काळात 100 कोटी रुपये देण्यात आलेले होते आणि इतकेच नाही तर त्यासोबतच प्राण्यांवर करायच्या सर्व प्रयोगासाठी, सर्व प्रकारच्या संशोधनात आणि  अभ्यासात 'रिसर्च इंस्टिट्यूट ट्रन्स्लेशनल हेल्थ सायन्स टेक्नॉलॉजी इंस्टिट्यूट' (टीएचएसटीआय)   फरीदाबाद यांच्या माध्यमातून सरकारने सहकार्य केले. 

हे सर्व भारत सरकारच्या 'मिशन कोविड सुरक्षा - भारतीय कोविड -19 लस विकास मिशन' या अंतर्गत करण्यात येत आहे. जी भारतात कोविड-19 लस विकासाच्या प्रयत्नांना बळकटी व गती देण्यासाठी सुरू करण्यात आलेली एक योजना आहे आणि तिचा समावेश आत्मनिर्भर भारत-3 मध्ये करण्यात आलेला आहे. 

'नागरिकांपर्यंत एक सुरक्षित, कार्यक्षम, परवडणारी व सर्वाना घेता येईल अशी, कोविड-19 लस मिळविणे' हे या मिशनचे उद्दीष्ट आहे. यासोबतच कमीत कमी पाच ते सहा कोविड-19 लस बनविन्यात रस घेणार्‍या कंपन्याना सहकार्य करणे सुद्धा सद्य परिस्थितीत सुरु आहे. 

यापैकी काही कंपन्या आता सरकारकडून परवानगी घेणे आणि लस सार्वजनिक आरोग्य यंत्रणेमार्फत जनतेसाठी खुली करण्याच्या जवळ आलेल्या आहेत. या मिशनमुळे केवळ कोविड-19 लस विकासाच्या प्रयत्नांना गती दिलेली नाही तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत  (एंड टू एंड) लस आपल्याच देशात कशी बनवता येईल? याच्या इकोसिस्टमला चालना दिलेली आहे. जी इकोसिस्टम सध्या चालू असलेल्या  कोविड-19 लसीच्या संशोधनासाठी आणि भविष्यातील इतरही आजारावरील लसींच्या संशोधन व विकासात्मक कामांसाठी उपलब्ध असेल. म्हणजेच मोदीजींच्या शब्दात, 'आत्मनिर्भर भारत' भविष्यातील गोष्टींसाठी आजच झालेला असेल. 

मला तरी असे वाटते की, भारतातील बऱ्याच लोकांना अजूनही या तिसऱ्या भारतीय लसीबद्दल क्वचितच माहिती असेल, म्हणूनच या लेखाचे शीर्षक "नरेंद्र मोदींची खासियत : सुमडीत कुमडी!" असे दिलेले आहे! 

धन्यवाद!!!

पवन!!! 



प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी : एक नीलकंठ!! श्री राहुल गांधीजी "ट्विटर बच्चो के खेलने की चीज नही है"!


लेखाचे 'शीर्षक' वाचून जरा अवाक झाले असाल तर त्याचे कारण पुढे दिलेले आहे. वाचा!! 

दोन दिवसांपूर्वी बातमी आली की, श्री राहुलजी गांधी यांनी  त्यांच्याच पक्षातील काही सहकार्‍यांना-पत्रकारांना आणि त्यांना अडचणीच्या वाटणार्‍या, अशा जवळपास 50  लोकांना त्यांनी  ट्वीटरवर अनफॉलो केलेले आहे. आपल्या देशाच्या राज्यघटनेने प्रत्येकाला आपले मत, 'संविधानिक भाषेत' मांडण्याचा अधिकार दिलेला आहे, मग ते विरोधी मत असेल तरीही, ज्याला 'लोकशाहीचे ठेकेदार' हे 'फ्रीडम ऑफ स्पीच किंवा फ्रिडम ऑफ एक्स्प्रेशन' म्हणतात. परंतु त्याचाच गळा ते रोज दाबून टाकत असतात, याच काही 'लोकशाहीच्या ठेकेदारांपैकी' एक असलेले, श्री राहुलजी गांधी यांनीही यावेळी असाच लोकशाहीच्या या मूल्यांचा गळा दाबलेला आहे. 

यातूनच आपल्याला असेही लक्षात येते की, श्री राहुलजी गांधी यांची प्रगल्भता, सहनशक्ती व खिलाडूवृत्ती कितपत आहे. ते नेहमी आरोप करतात की, देशाचे प्रधानमंत्री हे विरोधी पक्षाला किंवा विरोधी विचारांना थारा देत नाहीत.  परंतु , या घडलेल्या घटनेचे जर उदाहरण घेतले तर त्यांच्या या प्रश्नाचे उत्तर आपल्याला सहज मिळेल. कारण राहुलजी यांनी जे केले, त्याच्याउलट देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांचे आहे. 

माहिती घेण्याचा प्रयत्न केल्यावर लक्षात आले की, प्रधानमंत्री मोदीजी म्हणजेच त्यांचे ट्विटर हँडल हे बऱ्याच विरोधी पक्षातील नेत्यांना तसेच पूर्वी त्यांच्या पक्षात होते किंवा एनडीएमध्ये होते, पण आता पक्ष किंवा एनडीए सोडून गेलेले आहेत अशा लोकांना, यासोबतच काही व्यक्ती अशाही आहेत ज्या देशातील घटनात्मक पदावर बसलेल्या आहेत, तरी सुद्धा प्रधानमंत्री यांच्यावर विखारी भाषेत टीका टिप्पणी करतात, तरी सुद्धा प्रधानमंत्री त्यांना आजही फॉलो करतात, यावरूनच त्यांची प्रगल्भता दिसून येते. कारण आपण 'भारत' देशात राहतो जिथे 'लोकशाही' आहे.

चला तर मग आता नरेंद्र मोदी हे कोणकोणत्या विरोधी पक्षातील लोकांना फॉलो करतात ते बघुया!! 

सुरुवात मोदीजीँना रात्रंदिवस पाणी पिऊन पिऊन कोसणाऱ्या श्री राहुलजी गांधी यांच्यापासूनच करतो. कारण, त्यांना सुद्धा पंतप्रधान मोदीजी फॉलो करतात, त्यांच्यासोबतच काँग्रेसमधील दिवंगत नेते आणि कट्टर विरोधक मानले जाणारे श्री अहमद पटेल, आरपीएन सिंह, अभिषेक मनु सिंघवी, पृथ्वीराज चव्हाण, मिलिंद देवरा, रणदीप सुरजेवाला, दिग्विजय सिंग, शशी थरुर, अजय माकन, दिपेंद्रसिंह हुड्डा, कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्यासोबत अनेक काँग्रेस नेत्यांना ते फॉलो करतात. 

तसेच त्यांच्यावर रात्रंदिवस हल्लाबोल करत राहणारे बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि त्यांचे वडील माजी मुख्यमंत्री श्री लालूप्रसाद यादव, यांच्यासोबत कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनाही ते फॉलो करतात. 

देशातील सर्व मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना ते फॉलो करतात. त्यामध्ये घटनात्मक पदावर बसून मोदींचा रोज दुस्वास करणाऱ्या ममता बॅनर्जी, यापूर्वी देशाच्या पंतप्रधानांना 'खोटारडा आणि पागल' म्हणून पोस्ट करणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया सुद्धा येतात. 

यासह दररोज उठून सरकारला आणि पर्यायाने मोदींना दुषणे देणाऱ्या विरोधी पक्षातील नेते, ज्यामध्ये जम्मू कश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या नेत्या महबूबा मुफ्ती, शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या आणि पूर्व केंद्रीय मंत्री हर मिसरत कौर बादलही येतात ज्यांनी मागील वर्षी राजीनामा देऊन सरकार आणि एनडीए मधून काढता पाय घेतला, जनता दल युनायटेडचे माजी नेते शरद यादव, यांच्यासारखे अनेक नेते आहेत, जे पूर्वी सरकारमध्ये किंवा एनडीएमध्ये होते आणि आता सोडून गेलेले आहेत, त्यांना अजूनही मोदीजी फॉलो करतात. 

इतकेच कशाला, स्वतः मोदींना शिव्याशाप करून भाजपा सोडून विरोधी पक्षात गेलेले नवज्योत सिंग सिद्धू, कीर्ती आझाद, प्रदयोत बोरा, उदित राज जे दररोज ट्विटरवर मोदींच्या नावे बालिश आरोप करीत राहतात, त्यांना ते आजही फॉलो करतात. 

शेवटी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याची असलेली महाराष्ट्रातील सत्ता, ज्या ठाकरेंमुळे गेली, त्या 'ठाकरेंच्या पोराला/नातवाला' म्हणजेच 'आदित्य ठाकरे' यांना आजही मोदी फॉलो करतात, त्यांच्यासोबतच 'ममता दीदीचे भाचे' असलेले तृणमूल काँग्रेसचे 'अभिषेक बॅनर्जी' यांच्यासारख्या तरुण नेतृत्वाला, विरोधात असूनही आणि जिव्हारी लागण्यासारखे कार्य केल्यानंतरही त्यांना अनफॉलो केलेले नाही. 

यामुळेच मला लेखाचे शीर्षक हे 'प्रधानमंत्री नरेंद्र मोदी: एक नीलकंठ' असे समर्पक वाटते! 

जाता जाता शेवटी एक गोष्ट नमूद करतोय, सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,  2014 मध्ये  जेव्हा हे सरकार आले होते, त्यावेळी जवळपास 100 वैयक्तिक खात्यांना ट्वीटरवर अनब्लॉक करण्यात आले होते, ज्यांना 2014 पर्यंत असलेल्या सरकारने ब्लॉक करून ठेवलेले होते. यावरूनच लक्षात येते की, 'सहनशीलता आणि विरोधी विचार ऐकण्याची खिलाडूवृत्ती' ही आधिपासूनच नाही. 

फक्त आज राहुलजी गांधी यांनी केलेल्या कृतीमुळे हे सगळे जनतेसमोर आले,  त्यासाठी धन्यवाद राहुलजी!! 

धन्यवाद!!! 

पवन!!!


'किसान रेल्वे'-मोदींच्या शिरपेचातील मानाचा तुरा!!

मित्रांनो कोरोना संकटाच्या काळात म्हणजेच मागील वर्षी  डिसेंबर 2020 मध्ये 'किसान रेल' ही आपली पहिली फेरी घेऊन निघालेली होती.

या लेखामधून जाणून घेऊया या 'किसान रेल' बद्दल. 

रेल्वेच्या या कोल्डस्टोरेज सुविधेबाबत पहिल्यांदा घोषणा ही सन 2009-10 च्या अर्थसंकल्पात तत्कालीन रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली होती. पण यूपीए-1आणि यूपीए-2 च्या ट्रॅक रेकॉर्डनुसार बाकीच्या योजनांसारखी ही योजना सुद्धा पडीत राहिली आणि मग 2014 नंतर मोदी सरकार आल्यावर, यावर पुनश्च काम सुरू झाले आणि 2020 च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारमण यांनी, 'पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप' (पीपीपी) मॉडेल अंतर्गत या 'किसान रेल्वे'ची घोषणा केली, ज्यातून 2022 पर्यंत शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या 'मोदी सरकार'च्या उद्दीष्टात 'भारतीय रेल्वे'च्या माध्यमातून शेतकर्‍यांची मदत करता येऊ शकेल. 

तिथून फक्त सहा महिन्यातच म्हणजेच, दिनांक 7 ऑगस्ट 2020 रोजी, महाराष्ट्रातील देवळाली ते बिहारमधील दानापूरपर्यंत 1519 किमी प्रवास 31 तासांमध्ये पूर्ण करणार्‍या आणि आठवडी असणार्‍या, या पहिल्या 'किसान रेल्वे' ला केंद्रीय कृषिमंत्री श्री नरेंद्र सिंग तोमर आणि केंद्रीय रेल्वेमंत्री श्री पियुष गोयल यांनी कोरोना काळ असल्यामुळे विडिओ कॉन्फ्रेंसिंगच्या माध्यमातून हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली. 

या 'किसान रेल' मुळे भाजीपाला, फळे यासारखी नाशवंत कृषी उत्पादने अल्पकाळात बाजारात आणण्यास मदत झाली.  गोठविलेले (फ्रोझण) कंटेनर असलेल्या या ट्रेनने मासे, मांस आणि दुधासह, इतर नाशवंत पदार्थ राष्ट्रीय स्तरावर वाहतूक करण्याची शीत पुरवठा साखळी (कोल्ड स्टोरेज चेन) तयार झालेली आहे. 

सुरुवातीच्या काळात आठवड्यातून एकदा असलेली ही  'किसान रेल्वे' सध्याच्या घडीला आठवड्यातून तीनदा करण्यात आलेली आहे. केंद्र सरकारने लॉकडाऊनच्या काळात सुद्धा ही रेल्वे सुरू ठेवली होती. कारण  शेतकऱ्यांचा माल खराब होऊन आर्थिक नुकसान होवू नये, याची सरकारला काळजी होती. 

2020 च्या डिसेंबर महिन्यात प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांनी 100 व्या 'किसान रेल्वे' ला हिरवी झेंडी दिलेली आहे, जी महाराष्ट्रातील सांगोला येथून पश्चिम बंगालमधील शालिमार पर्यंत जात आहे. 

'किसान रेल्वे' यशस्वी का ठरली त्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत: 

1. मोदी सरकारने भारताच्या कानाकोपऱ्यापर्यंत असलेल्या भारतीय रेल्वेच्या नेटवर्कचा वापर करून या 'किसान रेल्वे'ची वाहतूक शेती आणि वेअर हाऊस पर्यंत नेली. 

2. 'ऑपरेशन ग्रीन' अंतर्गत मोदी सरकारने फळे आणि पालेभाज्या यांच्या वाहतुकीवर 50% सबसिडी (अनुदान) सुद्धा दिली. 

3. रेल्वे वाहतुकीमुळे पंधरा तास वेळेची बचत व्हायला लागली, जी रस्तामार्गे होत नव्हती आणि त्यासोबतच प्रती टन 1000 रुपये वाहतूक ख़र्च बचत सुद्धा व्हायला लागली. 

4. 'भारतीय रेल्वे'ची सेवा ही कधीही आणि कोठेही उपलब्ध आहे आणि त्यामुळे 'किसान रेल्वे'मध्ये, कमीत कमी किंवा जास्तीत जास्त मालाचे बंधन नाही. म्हणजेच, जेवढे असेल तेवढेच द्या, वाहतूक केली जाईल. 

5. फळे, पालेभाज्या, मास आणि इतर नाशवंत पदार्थ, हे कोल्ड स्टोरेज मध्ये एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावर वाहतूक केल्यामुळे ते खराब होणे बंद झाले आणि यातून दरवर्षी सुमारे आठ दशलक्ष खराब होत असलेली फळे आणि पालेभाज्या यांची बचत व्हायला लागली. 

6. किसान रेल्वे ही नेमून दिलेल्या मार्गावर वेळेवर धावते, त्यासाठी त्यांच्या मार्गात येत असलेल्या खोळंब्यावर आणि अडचणींवर लक्ष ठेवून त्या वेळीच दूर केल्या जातात, जेणेकरून त्यांना उशीर होऊन शेतकर्‍यांचा माल खराब होणार नाही.

नुकत्याच तेलंगणामध्ये सुरू झालेल्या किसान रेल्वेला, शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी, त्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल शाब्बासकी मिळालेली आहे. 

इतकेच नव्हे तर भारताचे राष्ट्रपती महामहिम श्री रामनाथ जी कोविंद यांच्या मते, "देशभरात सुरू झालेल्या या 'किसान रेल्वे'मुळे शेतकऱ्यांना नवीन बाजारपेठ उपलब्ध झालेली आहे. ही रेल्वे म्हणजे 'चालतं फिरतं कोल्डस्टोरेज' आहे, आतापर्यंत 100 पेक्षा जास्त किसान रेल्वे सुरू झालेल्या आहेत, जिच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात धान्य, पालेभाज्या, फळे आणि इतर नाशवंत पदार्थ, हे देशातील एका भागातून दुसर्‍या भागात वाहतूक करण्यात आलेले आहेत." 

'किसान रेल्वे' सेवेचा आणखी विस्तार करण्यासाठी भारतीय रेल्वेकडून कृषी मंत्रालय, विविध राज्य सरकारे आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्याकडे पाठपुरावा केला जात आहे.

PIB नुसार, दिनांक 22 जानेवारी 2021 पर्यंत, कृषी मंत्रालय, विविध राज्य सरकारे आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्याकडून मिळालेला अभिप्राय आणि अपेक्षित असलेली मागणी यांचा विचार करून, देशात खालील 18 मार्गांवर 157 किसान रेल्वे या दिलेल्या तारखेला सुरू करण्यात आलेल्या आहेत. ज्यांच्या माध्यमातून एकूण 49000 टन मालाची वाहतूक आतापर्यंत करण्यात आलेली आहे. 

आपला देश 'कृषीप्रधान' आहे, असं लहानपणीपासून आपण पुस्तकात वाचत आलेलो आहे. परंतु ज्यावेळी या देशातील शेतकऱ्यांसाठी काही करायची वेळ येते, तेव्हा कोण किती काम करतो? हे या छोट्याशा उदाहरणावरून दिसते. 

2009 ला घोषणा केलेली 'किसान रेल्वे' 2014 पर्यंत सुद्धा सुरू न करू शकलेले युपीए सरकार कुठे आणि 2020 च्या अर्थसंकल्पात घोषणा करून सहा महिन्यांनी म्हणजेच दिनांक 7 ऑगस्ट 2020 रोजी सुरू करणारे मोदी सरकार कुठे!! 

मुख्यतः 2009 ते 2014 या युपीए सरकारमध्ये आज घडीला विरोधात बसून असणारे आणि सरकार कशाप्रकारे शेतकरीविरोधी आहे, हे गळे फाडून सांगणारे जवळपास सर्वच विरोधी पक्ष त्या सत्तेत सहभागी होते. पण ही सुविधा सुरू करायला शेवटी मोदी सरकार सत्तेत यावे लागले. 

आता भलेही ज्याप्रमाणे आधार कार्ड किंवा यूपीएच्या काळात केलेल्या इतर घोषणांसारखे, ज्याला प्रत्यक्षात मूर्त स्वरूपात उतरवून त्याचा खुबीने जनतेच्या भल्यासाठी मोदींनी वापर सुरु केला. तरीही क्रेडीट काँग्रेस किंवा विरोधकांना पाहिजे असेल तर ते आताही घेऊच शकतात की आम्ही 2009-10 ला घोषणा केलेली होती म्हणून.

म्हणजे नाही का, समजा एखाद्या मुलीच्या किंवा मुलाच्या पाहण्याच्या कार्यक्रमासाठी निरोपाला आपण गेलो, पोहे खाल्ले आणि सांगून आलो की कळवतो. पण नंतर कळवले नाही आणि त्या मुलीचे किंवा मुलाचे लग्न हे कुठे दुसरीकडे झाले, त्यानंतर त्याला मुलं-बाळ झाले आणि मुलं-बाळं झाल्यावर आम्ही म्हणायचं की, अरे ही तर आमचीच देन!! अशीच अवस्था सध्या काँग्रेस आणि विरोधी पक्षाची आहे. 

धन्यवाद!!! 

पवन!!!


नंबी नारायण, 2002 गुजरात दंगल आणि मोदीजी, सोनिया गांधी, क्लिंटन फाउंडेशन, जो बिडेन आणि संत चटवाल!!

1992 मध्ये भारताच्या अंतराळ मोहिमेसाठी क्रायोजेणीक इंजिन निर्मितीकरिता रशियाद्वारे  केली जात असलेली मदत जो बिडेन यांनी रोखली होती.



परंतु, भारताने आपला अंतराळ मोहिम कार्यक्रम सुरूच ठेवला. 1994 मध्ये सीआयए कडून नंबी नारायण आणि त्यांच्या टिमवर खोटे आरोप लावून सर्व अंतराळ मोहीम कार्यक्रम नष्ट केले गेले.

नंबी नारायण यांच्यामते, ज्यांनी त्यांना या खोट्या केसमध्ये अडकविले होते त्या काही लोकांपैकी एक हे आर.बी. श्रीकुमार होते.


माजी रॉ अधिकारी श्री एन. के. सूद यांच्यामते, आणखी जी व्यक्ति यात सामील होती, ती म्हणजे रतन सहगल. जो त्यावेळी आयबी मध्ये राहून आणि सीआयए साठी काम करीत होता आणि सोबतच तो माजी उपराष्ट्रपती श्री हमीद अंसारी यांचा अत्यंत निकटवर्तीय होता. 


सन 2005 मध्ये यूएसच्या फर्स्टलेडी हिलरी क्लिंटन या राजीव गांधी फाउंडेशनच्या दिल्लीतील कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून सहभागी झाल्या होत्या. त्यात त्यांनी यूएसए आणि भारतातील स्वयंसेवी संस्थांना (एनजीओ) 100 दशलक्ष अनुदानाचा नवीन कार्यक्रम जाहीर केला.



सन 1997 मध्ये क्लिंटन परिवाराने क्लिंटन फाउंडेशन नावाची स्वयंसेवी संस्था (एनजीओ) स्थापन केली जशी आपल्याकडे गांधी परिवाराने राजीव गांधी फाउंडेशन स्थापन केले होते. या दोघांचेही नंतर खास टाय-अप झालेले आहे.

क्लिंटन फाउंडेशनचे डाऊ केमिकल्स (भोपाळ गॅस दुर्घटना कंपनी) आणि फायझरसह अनेक देणगीदार आहेत!



सन 2000 मध्ये एसबी श्रीकुमार याला गुजरात पोलीसमध्ये ट्रान्सफर करण्यात आले.

सन 2001 मध्ये सोनिया गांधी यांनी यूएसएला भेट दिली आणि त्यांच्यासाठी मेजवानीचा कार्यक्रम जो बिडेन यांनी आयोजित केला होता. क्लिंटन आणि बिडेन हे दोघेही डेमोक्रेटिक पार्टीशी संबंधित आहेत.




2002 च्या गुजरात दंगलीनंतर श्रीकुमारने जीवतोडून गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना दंगलीच्या केसेसमध्ये अडकविण्याचे कसोशीने  प्रयत्न केले.

2017 मध्ये त्याच्या निवृत्तींनंतर त्याला तीस्ता सेटलवाड आणि कोंग्रेसकडून मोदींच्या विरोधात उभे केले गेले. 

तीस्ता सेटलवाड हिला बरेचदा फोर्ड फाउंडेशन आणि भारतीय वंशाच्या अमेरिकन 'चटवाल' परिवाराकडून देणगी प्राप्त झालेली आहे.


 

संत चटवाल हा 1994 मध्ये केलेल्या बँक ऑफ इंडियाच्या केलेल्या फ्रौडमुळे भारतात वॉन्टेड अपराधी होता आणि तोच यूएसए मध्ये क्लिंटन फाउंडेशनमध्ये ट्रस्टी होता व क्लिंटन परिवाराचा अतिशय निकटवर्तीय सुद्धा होता.



विकिलीक्सच्या खुलास्यानुसार, याच संत चटवालने 2008 च्या केस फॉर वोटकांड मध्ये अकाली दलाच्या खासदारांना विकत घेण्याचा प्रयत्न केला होता.

सन 2011 मध्ये भारतातील तिसर्‍या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार 'पद्माभूषण' याच संत चटवालला प्रदान करण्यात आला.



ज्यावेळी 2020 मध्ये जो बिडेन अमेरिकेचे राष्ट्रपती बनले त्यावेळी संत चटवाल हा इंडियन अमेरिकन डेमोक्रेट्सचा चेयरमेन होता.


आम्ही हे इथे संपवत नाही आहोत. आता फक्त 1992 ते 2020 या दरम्यान घडलेल्या घटना आपल्यासमोर मांडलेल्या आहेत.


सर्व संदर्भ आणि पुरावे विजय गजेरा यांच्या इंग्रजी थ्रेड पोस्ट वरून साभार.

भारत 1989-2014 आणि नंतर - आमुलाग्र बदल!!

रविवार विशेष!! आजचा लेख जरा जास्तच मोठा आहे. पण भारताचा भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ समजून घ्यायचा असेल, तर आवर्जून वाचाच. भारतात नेहमीच...