Tuesday, November 9, 2021

'नोटबंदी'वर जयराम रमेश यांना उत्तर!

काल नोटबंदीवर टीका करताना माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे नेते श्री जयराम रमेश यांनी काही आकडेवारी दिली. त्याचे खंडन करताना आदरणीय श्री आलोक भट्ट यांनी खूप मस्त पुराव्यासकट उत्तर दिलं ते तुमच्यासमोर ठेवतोय.

29/10/2021 रोजी चलनात असलेल्या नोटा या 29.17 लाख करोड रुपयाच्या होत्या.  यामध्ये झालेली वाढ ही 2,28,963 करोड रुपये होती आणि मागच्या वर्षीची वाढ ही 4,57,059 करोड रुपये होती. इतकेच नव्हे तर 2019 ची वाढ 2,84,451 कोटी रुपये होती.



आयआयटीयन असलेले जयराम रमेश हे कदाचित ही गोष्ट समजू शकले नाही म्हणून त्यांना सांगावसं वाटतं की, जयरामजी आपण एकदम बरोबर रस्त्यावर आहोत.

2020-21 च्या दरम्यान नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात लोकांनी आपल्या खात्यातून रक्कम उचलून आपल्याजवळ ठेवली होती. कारण कोरोनाची आपत्कालीन परिस्थिती होती आणि कधीही गरज पडू शकते म्हणून लोकांनी रक्कम बँकेत न ठेवता आपल्याजवळ ठेवली होती. इतक सोपी कारण या झालेल्या वाढीच आहे.

2019-20 या आर्थिक वर्षात 14.7 ही वाढ होती तर 2020 21 यादरम्यान हीच वाढ 16.8 झाली. यावरून तुम्हाला फरक लक्षात येतो की, लोकांनी थोड्याफार जास्त प्रमाणात आपल्याजवळ गाठीला ठेवलेला होता.


ते पुढे असे म्हणाले की, त्यांना विश्वास आहे की जयराम रमेश त्यांना माहिती आहे की 'राष्ट्रीय निर्देशांक' हा जीडीपी वाढ, चलनवाढ, इत्यादी सारख्या अनेक घटकांवर अवलंबून असतो आणि कोरोनाचा कठीण काळ असतानाही 2020-21 या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेने वाढीचा दर चढत्या क्रमात  ठेवलेला आहे. काँग्रेसला नक्कीच दुःख होऊ शकतो इतका ठेवलेला आहे 

आर्थिक वर्ष 15-16  च्या शेवटी 16.41 लाख कोटी मूल्याच्या नोटा चलनात होत्या. 14-15 च्या तुलनेत 14.51% ही वाढ होती. याच दराने चलनात असलेल्या नोटा 2021 च्या अखेरीस 28.26 लाख कोटी रुपयांच्या ऐवजी 32.62 लाख कोटी असायला हव्या होत्या. हे लक्षात घ्या जयराम रमेशजी.

जयराम रमेश यांना दुःख झाले हे फक्त काही 'राष्ट्रीय निर्देशांका'च्या बाबतीतीलच नाही तर 'डिजिटल पेमेंट' करण्याच्या  संदर्भातील भारतीय अर्थव्यवस्थेत गेल्या काही वर्षात जे गुणात्मक बदल दिसून आले त्यामुळे सुद्धा झालेले आहे, हे लक्षात येते. तो बदल फक्त जयराम रमेश यांनाच दुखत नाही तर त्यांचे सहकारी 180 डिग्री चा आयक्यू असलेले चिदंबरम यांनाही दुःख देणाराच आहे.


पुढे आणखी डाटा टाकण्यापूर्वी असे काही तरी दाखवू इच्छितो जे नोटबंदी केल्यामुळे शक्य झाले आहे. देशाच्या वित्तमंत्री निर्मला सीतारामनजी यांना जे दिसू शकते ते तुमच्यासारख्या आयआयटीयनला का दिसत नाही? याच आश्चर्य वाटतं. अच्छा मला समजलं तुम्ही 'असंतुष्ट जीवी' आहात किंवा मग 'परजीवी' आहात, म्हणून तुम्हाला दिसत नाही. 


नोटबंदीमुळे डिजिटल व्यवहार वाढण्यास मदत झाली हे तुम्हाला मान्य करावेच लागेल. कारण 2017 पासून सातत्याने पारंपारिक व्यवहार करण्याच्या पद्धतीपेक्षा जास्त व्यवहार डिजिटल पद्धतीने करण्याच्या प्रमाणात वाढच होत राहिली आहे. खोटं वाटत असेल तर खालील ग्राफ बघा ज्यातून तुम्हाला कशा पद्धतीने वाढ झाली? हे दिसेल.



जयराम रमेशजी आपले डोळे उघडा आणि खरं काय आहे? ते बघा.

आजघडीला रूपे कार्ड हे आंतरराष्ट्रीय स्तरावर चालते ते फक्त चालतच नाही तर आत्ताच काही दिवसांपूर्वी भारत सरकार आणि सिंगापूर सरकार दरम्यान यूपीआयच्या माध्यमातून चिल्लर व्यवहाराकरिता लगेच ट्रान्सफर होण्यासाठी करार केला गेला आहे. हे शक्य झाले ते नोटबंदीमुळे.





गेल्याच महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यूएन मध्ये संबोधित केले. त्यावेळी त्यांनी यूपीआय, रूपे व भीम द्वारे 'भारताची डिजिटल पेमेंट क्रांती' काशी या जागतिक पटलावर सांगण्यासारखी आहे हे ते सांगितले. जयरामजी नेहरूंच्या काळात जगाला आपल्या देशाची विशेषता दाखविण्यासाठी सर्पमित्रांचा वापर करून गारुड्याचा खेळ दाखवल्या जात होता. आता ते दिवस राहिले नाहीत. मोदीजी जे जमिनीवर करतात ते जगाला दाखवतात.



आता पुढच्या मुद्द्यावर येतो. डायरेक्ट टॅक्सेस म्हणजे प्रत्यक्ष कर आणि जीडीपी गुणोत्तर हे 2008-2016  च्या दरम्यान म्हणजे 8 वर्षाच्या कालावधीत 1 टक्क्यांनी घसरले होते. 



पण 2017 पासून त्याचा कल हा वरच्या बाजूनेच चढताना दिसला आणि आता 2019 मध्ये 6 टक्के झाला आहे. ही वाढ अनुक्रमे 2017, 18 आणि 19 या वर्षात 0.2%, 0.8% आणि 1% आहे. ज्यामुळे 40,000 कोटी, 1.25 ट्रिलियन आणि 1.89 ट्रिलियन हे प्रत्यक्ष कराच्या माध्यमातून जमा झालेले आहेत. 


श्री जयरामजी 2014 पासूनचे 'निव्वळ प्रत्यक्ष कर' संकलन खालीलप्रमाणे आहे. जर तुम्ही महामारीचे वर्ष सोडले तर बाकी सर्व वर्षांमध्ये नोटबंदीनंतर झालेल्या कर संकलनात दोन आकडी वाढ झालेली दिसेल.

हे सर्व काही 8 नोव्हेंबर 2016 ला 8 वाजता नरेंद्र मोदीजी यांनी दिलेल्या भाषणानंतर झालेले बदल आहेत.
डाटा दाखवतोय आवर्जून बघा.



जयरामजी प्रत्यक्ष कर संकलनातील या वाढीसोबत योगायोगाने वैयक्तिक आणि व्यावसायिक करदात्यांच्या परताव्याच्या संख्या देखील वाढीस लागली जी या वाढीशीसुद्धा जुळते.




आणखी सांगा किती डाटा देऊ तुम्हाला ?  'नोटबंदी' या शब्दाबद्दल तुमच्या पक्षाचा आणि तुमचा असलेला तिरस्कार हा मला समजतोय. कारण नोटबंदीनंतर बनावट नोटांची संख्या झपाट्याने कमी झाल्याचे आपल्याला या चार्टच्या माध्यमातून दिसून येते आणि त्यामुळेच आपल्या पोटात दुखत आहे हे लक्षात येते.


कारण बनावट नोटांची संख्या कमी झाल्यामुळे हिरव्या आणि लाल दहशतवादाच्या सर्व दहशतवादी निधीची व्याप्तीही खूपच कमी झाली. तुमचा पक्ष आणि तुमच्याबद्दल पूर्ण सहानुभूती आम्हाला आहे. आम्हाला लक्षात येते की, नरेंद्र मोदी यांचे सरकार हे तुमच्या पक्षाबाबत किती निर्दयी झालेले आहे. 

जयरामजी नोटबंदीचे दीर्घकालीन फायदे अर्थव्यवस्था आणि लोकांना सहन कराव्या लागलेल्या अल्पकालीन  अल्पकालीनत्रासापेक्षा जास्त आहेत आणि पंतप्रधानांवर जनतेचा विश्वास आहे. ज्यामुळे जनतेला लक्षात आले की, त्यांना होणार्‍या आजच्या वेदनामधून  भारतासाठी काहीतरी नक्कीच चांगले करण्याचा प्रयत्न आहे. म्हणूनच जयरामजी 2017 ते 2019 चे निवडणूक निकाल हे भारताचा आणि भारतीयांचा पंतप्रधानावरचा विश्वास दाखवतात.

तुम्हाला आणखी किती डेटा पाहिजे सांगा बर आयआयटीएन जयरामजी? तुम्ही नक्की वाचाव म्हणून  येथे खाली काहीतरी जोडतोय ते आवर्जून वाचा.


धन्यवाद 
पवनWriting hand टीप : मूळ थ्रेड सरांचा आहे. मराठी वाचकांनी विनंती केली, म्हणून भाषांतर!


भारत 1989-2014 आणि नंतर - आमुलाग्र बदल!!

रविवार विशेष!! आजचा लेख जरा जास्तच मोठा आहे. पण भारताचा भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ समजून घ्यायचा असेल, तर आवर्जून वाचाच. भारतात नेहमीच...